मंगळवार, ८ जून, २०१०

काय? का? कसे ?

धावपळीचे जीवन जगत असताना आपल्याला अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्यातील काही निर्णय अतिशय महत्त्वाचे असतात. कारण त्यावर आपला भविष्यकाळ, आपलं करीअर अवलंबून असते.म्हणून एखादा धोरणात्मक निर्णय घेताना सर्व शक्यता पडताळून विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असते.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी ध्येय्य असते. ज्याच्या जीवनात ध्येय्य नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. असेच ध्येय्य ठरवत असताना किंवा एखादा धोरणात्मक निर्णय घेत असताना आपल्याला मदत मिळते ती या प्रश्नांची काय? का? कसे ?

काय? --- मला नेमकं काय करायचं आहे.

का?----- हेच का करायचं आहे.

कसे?---- ते कश्याप्रकारे करायचे आहे.

ज्याचे हे तीन प्रश्न सुटले त्याला ध्येय्याप्रत पोहचण्यास वेळ लागणार नाही.

३ टिप्पण्या:

Previous Post Next Post Back to Top