मंगळवार, ८ जून, २०१०

काय? का? कसे ?

धावपळीचे जीवन जगत असताना आपल्याला अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्यातील काही निर्णय अतिशय महत्त्वाचे असतात. कारण त्यावर आपला भविष्यकाळ, आपलं करीअर अवलंबून असते.म्हणून एखादा धोरणात्मक निर्णय घेताना सर्व शक्यता पडताळून विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असते.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी ध्येय्य असते. ज्याच्या जीवनात ध्येय्य नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. असेच ध्येय्य ठरवत असताना किंवा एखादा धोरणात्मक निर्णय घेत असताना आपल्याला मदत मिळते ती या प्रश्नांची काय? का? कसे ?

काय? --- मला नेमकं काय करायचं आहे.

का?----- हेच का करायचं आहे.

कसे?---- ते कश्याप्रकारे करायचे आहे.

ज्याचे हे तीन प्रश्न सुटले त्याला ध्येय्याप्रत पोहचण्यास वेळ लागणार नाही.

गुरुवार, ३ जून, २०१०

टारगेट

माझ्या मते टारगेट हा निखळ मनोरंजन करणारा एक चांगला मराठी चित्रपट आहे. ज्यामध्ये हास्य आहे, मस्ती आहे आणि सस्पेन्स आहे. मुळ कथेला कमी वाव असला तरी मनोरंजन छान आहे.

सर्वांच काम चांगलं असलं तरी संजय नार्वेकरची भूमिका निश्चीत छान आहे. चित्रपट पहिल्यानंतर असं वाटतं मराठी चित्रपटांचा दर्जा नक्कीच सुधरला आहे. चित्रपटात एकही गाणं चांगलं नाही ही मात्र चित्रपटातील कमतरता आहे.

चित्रपटाचा विषय मराठी मनाला स्पर्श करणारा आसला तरी शेवट असा झाल्यामुळे यातून अंधश्रदधा निर्मुलन कसं होणार, प्रशासनावर आणि न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसांनी विश्वास ठेवायचा की नाही हा प्रश्नच पडतो .अंकुशचा शेवट मन दु:खी करतो. आणि त्याच्या friend च व्यसन संपलं की नाही हे समजत नाही. यातून काय संदेश घ्यावा ? असं असलं तरी मनोरंजन म्हणून चित्रपट पहाण्यासारखा आहे.

बुधवार, २ जून, २०१०

मैत्री

मैत्री......... उत्कटपणे जगलेली, पाण्यावर मारलेल्या रेषेसारखी असते. ज्यावेळी ती जगता त्यावेळी अनंत लहरीउमटतात. तो moment संपला की उरते निरव शांतता ! छेडू त्यावेळी उमटणारया सतारीसारखी , वीणेसारखी ती असते.अवकाश असतो ती छेडण्याचा ! हे छेड्णारा आणि छेड्ण्यासाठी हवा असतो समोर कुणीतरी.......... हवी असते कुणीतरी.

मैत्री हे असं नातं आहे की यामध्ये संकोच नावाचा शब्दच लागू पडत नाही. स्वत:चे विचार, मतं, सल्लामसलतं, घरगुती अड्चणी यासारख्या कोणत्याही विषयावर मनमोकळेपणाने चर्चा करता यते.

जिथं खरं बोलल्यावर माफ़ केलं जाईल याची खात्री नसते ती मैत्री कसली? अंतरंग उघड करण्याची ती खात्रीची जागा असावी.

मैत्रीमध्ये समोरच्याची चिंता अन त्यातून आलेल्या अपेक्शा ( expectation ) कधीच असू नयेत.समस्या सोडविण्यासाठी मैत्री असते आणि नसतेही. कारण ज्याचं त्यालाच भोगायचं असतं.मैत्रीत असावा विश्वास समोरच्या व्यक्तीच्या प्रयत्नावरचा त्याच्या असण्यावरचा.......

हो तु समर्थ आहेस समस्या सोडविण्यास. तुझ्या प्रयत्नावर मला विश्वास आहे कितीही वेळा हरलास तरी अंतीमत: तू जिंकणारच........ इतका विश्वास मैत्रीमध्ये निर्माण व्हावा.

जीवन

"जीवन एक प्रवास आहे." या प्रवासात अनेक स्टेशन येतात. तेथे आगळ्या वेगळ्या व्यक्ती भेटतात. त्यांच्याशी सुख दु:खाचे नाते केव्हा जोडले जाते कळतच नाही.

जीवनात सुखाला आणि दु:खाला महत्वाचं स्थान आहे.कारण एका दु:खामुळे अनेक सुखापासून मिळणारे आनंदावर पाणी पडते. जीवनात सुख दु:ख येणारच. दु:खाने खचून आत्मनाश करण्याऎवजी दु:खाशी दोन हात करणे योग्य कारण "जो दु:खाने दु:खी होत नाही तो दु:खाला दु:खी करतो."

आपण इतरांना सुख दिलं तर ते सुखही आपल्यामागे सावलीप्रमाणे येत राहाते आणि आपण इतरांना जी दु:खे देतो तिच दु:खे कालांतराने मोगलीच्या बूमरंग सारखी बूमरंग होऊन आपल्याला छ्ळतात.

जीवन म्हणजे वर्तमानकाळ होय.जीवन ही मरणाविरुदध चाललेली अखंड लढाई आहे. आपण हत्यारे खाली ठेवली की मरण आपल्याला जिंकते. जीवनाकांशा हे सर्वात मोठं शस्त्र.अगदी मरणाच्या दाराशी जाऊन थबकलेली व्यक्ती जीवनाच्या दुर्दम्य लालसेने मरणावर मात करून उठ्ते आणि हि लढाई पुन्हा लढू लागते. म्हणूनच म्हणतात Man dies when he wants to die.

जीवनात येणारा प्रत्येक moment एकदाच येतो पुन्हा पुन्हा येत नाही म्हणून जीवनातील प्रत्येक moment चा उपभोग मनापासून आनंदाने घ्यावा जीवनात प्रत्येकवेळी आनंदी असावं. मनात दु:ख असेल तरी चेहरा मात्र आनंदी ठेवावा कारण आजकाल लोकं फ़क्त चेहराच पहातात.
Previous Post Back to Top